पाल अंगावर पडल्यास का लगेच आंघोळ करावी.?

 पाल अंगावर पडल्यास का लगेच आंघोळ करावी.?

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3njv1zc
पाल हा तसा विचित्र दिसणारा प्राणी. इतर गोष्टीना न घाबरणारी माणसं पालीला मात्र घाबरतात. अत्यंत किळसवाण्या वाटणाऱ्या पालीला पाहिलं तरी अंगावर काटाच उभा राहतो. पाल अंगावर पडली की अंघोळ केली जाते. यामागे नक्की कारण काय?Ⓜ
असं म्हणतात, की पाल जर अंगावर पडली तर लगेच आंघोळ करावी. तिचा स्पर्श जरी झाला तरी अंग स्वच्छ धुवून घ्यावे.

काहीजणांना ही अंधश्रद्धा वाटते. मात्र ही काही अंधश्रद्धा नाही तर यामागेही काही वैज्ञानिक कारणे आहेत. वडीलधाऱ्या माणसांसाठी जरी हा परंपरेचा भाग असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालंय की, पालीचा स्पर्श आपल्या शरीरास झाल्यास तो भाग अथवा शरीर लगेच धुवून घ्यावे. पाल ही ‘फायलम कारडाटा’ या समूहात येते आणि या समूहातील प्राणी आपल्या शरीरातील विष (युरिक अॅसिड) आपल्या शरीरावर जमा करतात. त्यामुळे हे प्राणी सुरक्षित राहतात.
जेव्हा पाल आपल्या अंगावर पडते तेव्हा तिच्या शरीरातील विष ती समोरच्या शरीरावर फेकते.त्यानंतर हे विष छिद्रातून आत शरीरात जाते आणि आत जाऊन त्वचारोग किंवा शारीरिक व्याधीचं कारण बनू शकते. यामुळेच पाल अंगावर पडली तर आंघोळ करावी. काही ठिकाणी पूजाही केली जाते. या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. त्याचं महत्वही तसंच आहे. कारण तुळशीची पाने खाल्ल्याने विषाचा प्रभाव कमी होतो.Ⓜ
____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________



Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने